सर्वाधिक दर अमरावती परतवाड्यात
बागायती परिसर असलेल्या भागातील शेतजमिनीचे सर्वाधिक दर आहेत. त्या दृष्टीने पर्यटन स्थळ असलेल्या चिखलदरा व समृद्धी महामार्ग गेल्यामुळे नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शेतीचे दर गगनाला भिडले आहेत. राष्ट्रीय महामार्ग गेल्यामुळे शेतीला 50 लाख ते कोटीचा अभाव आला आहे.
वर्षभरात 50 टक्क्यांनी भाव वाढले
मागील काही वर्षात शेतजमिनीचे भाव दुप्पट वाढले आहेत. जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गामुळे जमिनीचे भाव कोटीच्या घरात गेले आहेत. जिरायती शेतीलाही भावाला आहे.
रस्त्यामुळे आले जमिनीला भाव
बागायती शेतीला सुरुवातीपासून भाव आहेत परंतु समृद्धी महामार्गामुळे जमिनीचे भाव दुप्पट झाले होते ज्या शेतकऱ्यांकडे रस्त्याच्या बाजूला जमिनी आहेत ते मालामाल झाले आहेत परंतु जिरायती शेतीला म्हणावा तसा भाव नाही