Kanda Chal Yojana :- सध्या राज्यभर कांदा उत्पादक शेतकरी कांदा साठवणुकीसाठी जुन्या पद्धतीच्या कुडाच्या आरणी तयार करून त्यामध्ये कांदा साठवणूक केली जात आहे. आत्तापर्यंत या आरणी तयार करण्यासाठी बाजरीचे सरमाड, पाचट बांबू, प्लास्टिक ताडपत्री यांचा वापर करत आले. परंतु कांदा हे एक जिवंत असल्याने त्याचे मंदपणे श्वसन चालू असते.
तसेच पाण्याचे उत्सर्जन देखील होत असते. त्यामुळे योग्य प्रकारे साठवण न केल्यास कांद्याला 45-60 टक्क्यांपर्यंत नुकसान होऊ शकते. हे नुकसान प्रामुख्याने वजनातील घट, कांद्याची सड व कोंब येणे इ. कारणांमुळे होते. यासाठी शासनाकडून आर्थिक सहाय्य्यही मिळत आहे.
Kanda Chal Yojana
कांदा चाळ अनुदान योजना

गटशेती, महिला बचत गट यांना सामुदायिक घेता येणार लाभ
खरीप व रब्बी हंगामामध्ये कांदा पिकाचे उत्पादन होते. राज्यात साधारण 136.68 लाख मे. टन इतक्या कांद्याचे उत्पादन घेतले जाते. त्यासाठी साधारणपणे एकूण 9.45 लाख हे. क्षेत्र कांदा पिकाखाली आहे. कांदा साठवण करण्याच्या गोदामासाठी रुंदी 3.90 मी. लांबी 12.00 मी. एकूण उंची – 2.95 मी.
(जमिनीपासून ते टाय लेवलपर्यंत) याप्रमाणे आकारमाण राहील. साधारण एक हे. धारण क्षेत्रावर 25 मे. टन कांदा उत्पादन होते. कांदाचाळ वैयक्तिक तसेच सामुदायिकरित्या शेतकरी याचा लाभ घेऊ शकतात. तसेच गटशेती, महिला बचत गट यांना सामुदायिक लाभ घेता येणार आहे.